
मुंबई : काही दिवसांपूर्वी शासनामार्फत रिक्षा परमिटला स्थगिती दिल्यानंतर आता महाराष्ट्र दिन 1 मे पासून ज्या रिक्षा चालकांना मराठी भाषा येणार नाही त्यांचे परमिट रद्द होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
यामुळे अमराठी रिक्षाचालकांनी 4 मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला असून परिवहन मंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत.



